टाकळी हाजी (विजय थोरात)

लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते.महाविद्यालयाची तर गोष्टच काही औरच असते.याचा प्रत्यय नुकत्याच ११ वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून पहायला मिळाला.जवळपास ११ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती,शिक्षकांनी केलेली शिक्षा,अशा अनेक आठवणींना उजळा दिला.धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला आहे; पण महाविद्यालयाची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले.टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील मा.बापुसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी (२०१३-१४) बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल ११ वर्षांनी स्नेहमेळावा संपन्न झाला.येथील उद्योजक सागर शांताराम घोडे यांना आपल्या शालेय आठवणी जागृत करण्यासाठी सवंगड्यांना एकत्र करण्याची कल्पना सुचली, मेडिकल क्षेत्रातील सागर सुरेश गावडे या मित्राने त्यासाठी नियोजन केले.खूप वर्षानंतर एकत्र आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून दिली.तसेच जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले.या मेळाव्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.गावडे, सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर खोमणे,आदर्श शिक्षक गोपीनाथ शेटे,पोपट वाळुंज,संभाजी गावडे,राजेंद्र गोसावी,भारती चाटे,नवनाथ धुमाळ,गजानन मुंजाळ हे शिक्षक उपस्थित होते.या बॅचचे काही विद्यार्थी आज डॉक्टर, फौजी, मेडिकल, उद्योजक, व्यावसायिक व कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याचे काम करत आहेत असे ऋषिकेश सोदक,निलेश चासकर,दौलत सोदक,फारुक पठाण ,सोमनाथ साबळे, सोमनाथ ऊचाळे,सोमनाथ टेमकर यांनी सांगितले. हे नाते, हा जिव्हाळा, ही आपुलकी कधीच तुटू नये, अशीच भोळीभाबडी इच्छा सर्वांच्या मनात कायम दाटून राहिली.जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं,आयुष्य असंच जगायचं असतं,असे म्हणत पूजा सोदक,मोनिका गावडे,हर्षदा गावडे,ज्योती खटाटे,सुप्रिया भोसले,गौरी मुंजाळ,चित्रा चाटे,पूजा गावडे,शुभांगी घोडे,सोनल साबळे,प्रतीक्षा पाचंगे या मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे आयोजन गोविंद नायकोडी,दत्ता चादर,प्रशांत घोडे, प्रश्नांत पवळे,वैभव शिंदे,अभि चौधरी,अतुल साबळे,अक्षय बिबे,सुनील खामकर यांनी केले.*चौकट*सध्याच्या धावत्या काळात सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात.अशा परिस्थितीत लहानपणीचे सवंगडी आपल्याला भेटत नाही,मित्रांच्या सुख दुःखाच्या गोष्टी त्यांच्या अडचणी लक्षात येत नाही यासाठी आपआपसांत हितगूज व्हावे, सर्वांमध्ये सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे आणि त्यामधून समाजपयोगी उपक्रम राबवावेत असा या स्नेहमेळाव्याचे उद्देश आहे.श्री.सागर शांताराम घोडे (युवा उद्योजक)

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button