प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव म्हाळुंगीत २०२४ -२०२५ या शैक्षणिक वर्षांत विविध स्पर्धा परीक्षा व क्रिडा स्पर्धेत यशस्वी ३८ विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.इ.४ थी मधील विद्यार्थी स्वराज शरद रणदिवे याचा मंथन परीक्षेत राज्यात दुसरा आणि अभिरूप परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक आल्याने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना फेटे बांधून व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले शाळेतील सर्व शिक्षकांना शाळेची प्रतिमा भेट देऊन सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर,शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे,पंचायत समिती मा.सदस्य विजयदादा रणसिंग,सरपंच बापूसाहेब काळे,मा.सरपंच ज्योतीताई शिर्के,मा.सरपंच सविताताई करपे,मा.सरपंच अर्जुन नवले,म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बबनराव रणदिवे,दै.लोकमतचे पत्रकार पर्यावरण अभ्यासक प्रवीणकुमार जगताप सर्व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,विविध कार्यकारी सोसायटी संचालक ग्रामस्थ व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी म्हणाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास केला जातो.युपीएससी,एमपीएससी यासारख्या स्पर्धापरीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांत जिल्हा परिषद शाळेचा टक्का जास्त असून तो वाढतच राहणार आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षक पालक विद्यार्थी हा त्रिकोण महत्त्वाचा आहे शिक्षकांबराबरच पालकांनीही आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ॲड.गणेश शिर्के यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मान चिन्ह सौजन्य दिले व विजयदादा रणसिंग यांनी शाळेसाठी ५००० रुपयांची देणगी प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे यांच्याकडे सुपूर्द केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव भोरडे यांनी केले तर मारुती निकम यांनी आभार मानले.