शुभम वाकचौरे

निर्वि (ता शिरूर)येथील स्व. भाऊसाहेब दगडू सोनवणे देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदीच्या पतनावेळी अयोध्येत कारसेवक म्हणून आपले आजोबा सेवेसाठी गेले होते.अशी माहिती स्वर्गीय भाऊसाहेब दगडू सोनवणे यांचे नातू सुजल संतोष सोनवणे यांनी दिली.

कोण आहेत कार सेवक?भारताच्या इतिहासात 6 डिसेंबर 1992 ही तारीख फार महत्वाची आहे. याच दिवशी बाबरी मशिदी पाडण्यात आली होती. त्यामागे विविध कारणे आहेत. प्रदिर्घ लढाई आणि इतिहास आहे. त्यावेळी गावागावातून कार सेवेसाठी अयोध्येला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यात अनेक गावातील लोक सहभागी झाले होते. मंदिराच्या आंदोलनात सहभागी झालेले हे लोक कार सेवक म्हणून ओळखल्या जातात.

अयोध्येत सोमवारी राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. महाराष्ट्रातही भाजपकडून या सोहळ्यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. त्यासाठी अयोध्येला गेलेल्या कार सेवकांच्या अनुभव कथनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button