शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित अक्षरमंच काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धा संस्थापक अध्यक्ष न्यायप्रभात मासिक वृत्तपत्राचे संपादक शिवाजी खैरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्यात आयोजित केली जाते. स्पर्धेत सलग दोन वर्षे सहभागी स्पर्धकास पुरस्कृत करण्यात येते. शेकापूर येथील कवी संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम यांना उत्कृष्ट काव्यलेखनसाठी “अष्टपैलू काव्य भुषण गौरव पुरस्कार २०२४” जाहीर झाला आहे.नुकत्याच देवगड येथे संपन्न झालेल्या गोकुळ बालसंस्कार सामाजिक संस्थेकडून काव्यभुषण पुरस्कार २०२४ ने सन्मानित केले आहे.

प्रसिध्द कवी संतोष कदम यांच्या कविता आकाशवाणी व विविध वृत्तपत्रातून,प्रातिनिधीक काव्यसंग्रहातून प्रकाशित होत असतात. दैनिक लोकनेता वृत्तपत्राचे निर्भिड पत्रकार म्हणून देखील एक चांगलीच पकड आहे तसेच द युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.

पुरस्कार जाहीर झाल्याने शेकापूर गावक-याकडून व सर्वच स्तरांतून कदम यांचे कौतुक केले जात आहे. .

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button