गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
ता.21 कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन या समाजिक संस्थेचा रक्षाबंधना निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम आज गोलेगाव या ठिकाणी घेण्यात आला.रक्षाबंधन हा सन पूर्ण भारत भर मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो बहीण भावाचं पवित्र्य या सना द्वारे व्यक्त केले जाते.
याचं अनुषभघाने या संस्थेच्या वतीने गावातील नागरिकांमध्ये करुणा,प्रेम,दया,एकमेकांबद्दल रुजावी या साठी रक्षाबंधनाचा हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी सरपंच सुनिता पडवळ, उपसरपंच निलेश बांदल, सदस्य सुनिता वाखारे, ग्रामसेवक बारहाते,माझी सैनिक खंडू बोऱ्हाडे, जयवंत कटके, कांतीलाल वाखारे, एकनाथ जगदाळे, जगन्नाथ कटके, राजेंद्र वाखारे, बाळासाहेब वाखारे,कमल पवार, संध्या गायकवाड,शोभा पडवळ,सुरज माकर, वृषाली वरपे, शिवाजी विद्यालय विद्यार्थीनी,डॉ जाधव हे उपस्तिथ होते संस्थेच्या वतीने सौ.ललिता पोळ मॅडम उपस्तिथ होत्या.