जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
सोयाबीनच्या कट्ट्यांची चोरी केल्याप्रकरणी ओतूर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
या सदंर्भात अधिक माहिती देताना सचिन कांडगे यांनी सांगितले की,मांदारणे (ता. जुन्नर ) येथील सुरेश भिकू महाकाळ या शेतकऱ्याचे ४७ हजार रूपये किमतीचे १४ सोयाबीनच्या कट्ट्यांची चोरी झाल्याची फिर्याद महाकाळ यांनी दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता दिलीप रामा जाधव वय २२ मूळ रा.पिंपळगावजोगा सध्या रा.सितेवाडी, ता. जुन्नर,तुषार बाळू काळे वय २२ व प्रदीप नाथा काळे वय ३१ दोघेही रा.मांदारणे,साबर- वाडी, ता. जुन्नर या तिघांनी सोयाबीनच्या कट्ट्यांची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांना तत्काळ अटक करून त्यांचेकडून १३ हजार ४४० रुपये किमतीचे सोयाबीन व ४२ हजार रूपये किमतीची होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एमएच १४ केजी ३२५१ असा एकूण ५५ हजार ४४० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे,पोलीस नाईक जनार्दन सापटे,नदीम तडवी, संदीप लांडे व पोलीस हवालदार महेश पठारे यांनी केली.
याबाबत अधिक माहिती मिळते की याच चोरांनी मांदरणे परिसरात आणखी काही शेतकऱ्यांच्या गोडाऊन मधून लाखोंचे सोयाबीन व स्प्रिंकलर व ठिबकचे साहित्य चोरी केल्या आहेत मात्र शेतकऱ्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाही तरी याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी करून शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरपाई करून न्याय द्यावा असे पीडित शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.