(आंदोलनाचादिला इशारा )
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करू नयेअन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे व जुन्नर तालुका अध्यक्ष तानाजी तांबे यांनी कारखाना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
जुन्नर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी वसूल करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुन्नर तालुका अध्यक्ष तानाजी तांबे यांनी तीव्र विरोध केला आहे पाटबंधारे विभाग नारायणगाव यांनी मागील वर्षाच्या तुलनेत पाणीपट्टीमध्ये सहा पट वाढ केली असून पूर्वी सहाशे रुपये पाणीपट्टी आकारली जात होती परंतु शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार येथून पुढे एकरी चार हजार दोनशे रुपये पाणीपट्टी आकारली जाणार असे निर्देश दिले आहे त्यामुळे पाणीपट्टीत ६ पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पाटबंधारे विभागाने साखर कारखान्याच्या माध्यमातून पाणीपट्टी वसुलीचा तगादा लावला आहे विघ्नहर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून पाणीपट्टी वसूल करावी यासाठी पाटबंधारे विभागाने विघ्नहर सहकारी कारखान्यास पत्र व्यवहार केला आहे पाणीपट्टी सक्तीने वसूल करण्यास शेतकऱ्याचा तीव्र विरोध आहे विघ्नहर सहकारी कारखाना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून शासनाची वसुली करून देणार असेल तर बिद्री सहकारी साखर कारखाना कोल्हापूर यांनी उसाला प्रतिधन ३४०७ रुपयांचा भाव दिला आहे तोच भाव विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना द्यावा लागेल. त्यामुळे भान ठेवून विघ्नहर कारखाना चेअरमन यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाढीव पाणीपट्टीचा एकही रुपया भरावयचा नसून फक्त मूळ पाणी पट्टी शेतकऱ्यांनी भरावी असे आवाहन मनसे पुणे जिल्हा व जुन्नर तालुका संघटनेकडून करण्यात आले आहे तसेच वाढीव पाणीपट्टी भरण्यास विरोध असल्याचे मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे व जुन्नर तालुका अध्यक्ष तानाजी तांबे, सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी संघटनेच्या वतीने सर्व ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला केले आहे.