जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात आज शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले. या विद्यार्थ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ.राजश्री भालेकर यांनी दिली.
आज संपूर्ण राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू झाल्या. नव्याने शाळेत येणारे विद्यार्थी आणि पालक यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे कुतूहल दिसून येत होते.चैतन्य विद्यालयात ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी पण केली.संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, उपाध्यक्ष प्रभाकर तांबे,सचिव प्रदीप गाढवे,सहसचिव पंकज घोलप,सिताराम डुंबरे,शेखर डुंबरे,सचिन तांबे, संजय हिरे,अनिल उकिरडे,भाऊसाहेब खाडे,शरद माळवे,राजाराम शिंदे,विशाल चौधरी,आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प ,खाऊ, आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी मिळालेली नवीन पुस्तके आणि गुलाब पुष्प पाहून मुलांचे चेहरे आनंदाने ओसंडून वाहत होते. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी भगवंत घोडे,एम. एम. तांबे, प्रमोद जाधव, बाळासाहेब साबळे, संतोष सोनवणे, देवचंद नेहे,अमित झरेकर, मिलिंद खेत्री, आसावरी गायकर, वनिता भोर, लक्ष्मण दुडे, सोनाली माळवे, सोनाली कांबळे, अनिल जवरे, दिनेश ताठे, अपेक्षा गोरे, आशा डुंबरे, अश्विनी नलावडे, आराधना इसकांडे, निर्मला डोंगरे, साक्षी देशमुख, सौरभ ढमाले, सुनील शितोळे, ईश्वर ढमाले, अरविंद आंबरे,विजय खरात, रामदास ठोसर, मयुर जाधव,प्रसन्न तांबे, तेजस ढमाले आदींनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे , प्रभाकर तांबे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब खाडे यांनी तर अजित डांगे यांनी सूत्रसंचालन केले. शरद माळवे यांनी आभार मानले.