निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार

संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय गाजलेला असून नुकतीच राजगुरुनगर येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपोषणकर्ते संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी विराट सभा घेतली होती आणि विराट सभेला पुणे जिल्हा, जुन्नर, खेड तालुका ,शिरूर तालुका, हवेली तालुका, आंबेगाव तालुका ,हवेली तालुका आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य मराठा बांधव उपस्थित झाले होते उद्याच्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी मराठा आरक्षण किती महत्त्वाचे आहे हे त्या सभेच्या माध्यमातून मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे आणि म्हणून मराठा आरक्षण म्हणजे काय आणि मराठा आरक्षणाची गरज काय हे तळागाळापर्यंत अर्थात गावा गावांपर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत अर्थात ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचं काम स्वाभिमानी मराठा महासंघ करणार आहे ,या संदर्भात स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषिराज टकले पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त पोखरकर ,पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अलकाताई सोनवणे आणि पुणे जिल्हा कार्यकारिणी ,शिरूर/हवेली तालुका अध्यक्ष शितल कुमार गाजरे पाटील आणि कार्यकारिणी, शिरूर/हवेली तालुका महिला आघाडी अध्यक्ष शिवशंभु प्रिया जांभळे,आणि कार्यकारिणी यांच्या माध्यमातून गावागावांत स्वाभिमानी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत स्वाभिमानी बैठका चालू राहणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी मराठा महासंघ शिरूर हवेली/तालुका उपाध्यक्ष लहु सातपुते , महिला आघाडी कार्याध्यक्ष ज्योतीताई सातव यांनी दिली आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button